गाव दत्तक घेण्यासाठी मडीलगे खुर्द ग्रामस्थांची जोरदार मागणी ; आणि शाश्वत चळवळीने घेतले गाव दत्तक; चळवळीने आज साधला ग्रामस्थांशी संवाद

     
आज रविवारचा दिवस, तारीख १४ जून, मृग नक्षत्रातला पाऊस बाहेर बरसतोय, त्या पावसाच्या सरीचा आवाज,आणि थेंबाचा टपटप पडणाऱ्या पाण्याचा आवाज आणि मडीलगे खुर्द ता भुदरगड गावच्या कबीर धाम मध्येही आवाज होता तो कडकडणाऱ्या टाळ्यांचा, कारण होतं,… हात उंचावून आमचं गाव दत्तक घ्या, आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत, ही एकच मागणी ,आणि त्याला प्रतिसाद म्हणून शाश्वत विकास चळवळीने गाव दत्तक घेतलेच जाहीर केले आणि बरसणाऱ्या पावसाचा आवाज सुद्धा शेकडो मडीलगे खुर्द येथील स्त्री-पुरूषांच्या टाळ्यांचा आवाजाने क्षणभर क्षीण झाला. 
आज शाश्वत विकास चळवळीच्या कार्यकर्त्यांनाग्राम दत्तक योजनेसंदर्भात गावाने आमंत्रण दिलं होतं. त्याप्रमाणे सकाळी १० वाजता ग्रामस्थांबरोबर सभा झाली, या सभेचे स्वागत उपसरपंच सुरेश खोत यांनी करून गाव दत्तक घेण्याची विनंती केली, शाश्वत विकास चळवळीचे आनंदराव देसाई यांनी भूमिका पटवून दिली. प्राचार्य डॉ अर्जुन कुंभार यांनी शाश्वत विकासाची संकल्पना व महत्व विषद करताना प्रथम त्यांनी आपल्यानंतर येणाऱ्या पिढीला हा विकास उपकारक ,सुखकारक ठरावा,अशी अपेक्षा व्यक्त करून आज पर्यावरणाची गरज असून पर्यावरण टिकले तरच आपण टिकणार आहोत,अन्यथा येत्या कांही वर्षात संपुर्ण जग अनेक रोगांनी त्रस्त असेल,सध्याचा कोरोना हा फक्त ट्रेलर असून भविष्यात अनेक रोगांना आपण आमंत्रण देत असलेची भीती त्यांनी व्यक्त केली. 
जेष्ठ विचारवंत डॉ सुभाष देसाई यावेळी म्हणाले, आपण नको त्या धार्मिक कार्यावर खर्च करतो,त्यापेक्षा शिक्षण आणि आरोग्यासाठी तो खर्च झाला तर चांगले असून व्यक्ती आणि समाजाचा फक्त आर्थिक विकास होऊन चालणार नाही तर सांस्कृतिक विकास महत्वाचा असलेचे ते म्हणाले. 
प्राचार्य डॉ जयंत कळके म्हणाले, मडीलगे खुर्द या गावाला भौगोलिक आणि सांस्कृतिक इतिहास आहे,हे गाव शैक्षणिक दृष्ट्या आघाडीवर आहे. त्यामुळे हे गाव शाश्वत विकास चळवळीने दत्तक घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
प्रा. गौतमी कांबळे यांनी महिलांच्या आरोग्यासाठी चळवळ प्रयत्नशील असून महिला व युवकांचे या चळवळीसाठी मोठे योगदान देण्याचे आवाहन केले. 
यावेळी गावच्या सक्षम महिला सरपंच कु. गौरी खापरे यांनी शाश्वत चळवळीने गाव दत्तक घेतल्याबद्दल आभार व्यक्त करून गावचे ग्रामस्थ पूर्णपणे सहकार्य करतील अशी ग्वाही दिली. यावेळी माजी सरपंच सौ रेखाताई पाटील, गावच्या आशा सेविका सौ मंगल खापरे, खापरे सर, यांनीही गावच्या शाश्वत विकासासाठी मते मांडली, या बैठकीस बिद्री साखर कारखान्याचे संचालक धोंडीराम मगदूम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबुराव खापरे,एस एम.मगदूम, उपअभियंता नंदकुमार मोरे, धनाजीराव कुंभार, प्राचार्य बी एस माने, प्रा डॉ सागर पोवार, डॉ एम जी गुरव,यशवंत सरदेसाई, यांचेसह गावचे शेकडो स्त्री पुरुष उपस्थित होते, शेवटी बाबासाहेब मगदूम (मडीलगे खुर्द) यांनी आभार मानले.




No comments:

Post a Comment

Bhartiya Javananna Manvandhana

विद्रोही शाहिर रणजित कांबळे हा राजर्षिच्या जयंती दिनी त्यांना अभिवादन करताना..

Happy Birthday Utkarsh

Pages